लोक वार्ता –राज राठोड
पुणे: शहराच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरच आता हल्ले होऊ लागले आहेत. भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील प्रवीण डिंबळे यांच्यावर उंड्री-पिसोळी परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला. डिंबळे लघवीसाठी थांबले असताना गाडी थांबवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी लॉ कॉलेज रोड परिसरातही एका पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता. हे चित्र भयावह आहे—शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच आता स्वतःच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे.
या घटनेमुळे पुण्यातील पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का, या घटनेने असे देखील प्रश्न निर्माण झाले आहे. अशा आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असे ,वरिष्ठ पोलिसांनी सांगितले आहे.




















